दिल्ली // गेल्या काही महिन्यांत विकास दरात होणाऱ्या घसरणीचे खापर नीती अायाेगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी अारबीअायचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावर फाेडले. 'राजन यांच्या चुकीच्या धाेरणांमुळे एनपीए वाढला व विकास दर घटला. नाेटबंदीमुळे विकास दर घटल्याच्या अाराेपात तथ्य नाही. मात्र चिदंबरम यांच्यासारख्या लाेकांनी नाेटबंदीवर त्याचे खापर फाेडले याचे अाश्चर्य वाटते,' असे राजीव कुमार म्हणाले.
'राजन यांच्या कार्यकाळातच एनपीए वाढला, बँकिंग सेक्टरने उद्याेगांना कर्ज देणे बंद केले हाेते. त्यामुळे मध्यम व लघु उद्याेगांची क्रेडिट ग्राेथ येणे घसरली हाेती,' असेही राजीव कुमार यांनी सांगितले.
एप्रिल ते जून या तिमाहीत देशाचा विकास दर ८.२ % राहिला. गेल्या ९ तिमाहींत हा दर सर्वाधिक अाहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत विकास दर ७.७ % हाेता. नाेव्हेंबर २०१६ मध्ये नाेटबंदी लागू झाली. त्यानंतर विकास दर सातत्याने कमी झाला. एप्रिल ते जून २०१७ मध्ये ताे ५.६ % इतका घसरला हाेता. विराेधी पक्षांनी नाेटबंदीमुळेच हा दर घसरल्याचा अाराेप केला हाेता.
'राजन यांच्या कार्यकाळातच एनपीए वाढला, बँकिंग सेक्टरने उद्याेगांना कर्ज देणे बंद केले हाेते. त्यामुळे मध्यम व लघु उद्याेगांची क्रेडिट ग्राेथ येणे घसरली हाेती,' असेही राजीव कुमार यांनी सांगितले.
एप्रिल ते जून या तिमाहीत देशाचा विकास दर ८.२ % राहिला. गेल्या ९ तिमाहींत हा दर सर्वाधिक अाहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत विकास दर ७.७ % हाेता. नाेव्हेंबर २०१६ मध्ये नाेटबंदी लागू झाली. त्यानंतर विकास दर सातत्याने कमी झाला. एप्रिल ते जून २०१७ मध्ये ताे ५.६ % इतका घसरला हाेता. विराेधी पक्षांनी नाेटबंदीमुळेच हा दर घसरल्याचा अाराेप केला हाेता.
Social Plugin