परळी // परळी येथे जमात-ए-इस्लामी तर्फे तीन तलाक वा इस्लाम या विषयावरील कार्यक्रमात व्याख्यान पती-पत्नीमधील बिघडलेले संबंध समुपदेशन करून सुधारणे आवश्यक आहे. परंतु काही वेळा कौटुंबिक वाद विकोपाला जातात त्यात सुधारणा होतच नसेल तर पती-पत्नी अलिप्त होऊन आनंदी जीवन जगू शकतात.
तलाक हा आनंदी जीवनासाठी उत्तम मार्ग आहे. असे प्रतिपादन नांदेड येथील अब्दुल मजीद खान यांनी केले.
जमात इस्लामी हिंद परळी शाखेच्या वतीने शुक्रवारी तीन तलाक आणि इस्लाम या विषयावर आयोजित व्याख्यान कार्यक्रमात मजीद खान बोलत होता. यावेळेस सय्यद अन्वर, मराठा सेवासंघाचे एम. एल. देशमुख यांची उपस्थित होती. आझाद नगर येथील जमाते इस्लामी हिंदच्या सभागृहात व्याख्यान झाले.
इस्लाम मध्ये तीन तलाक म्हणून विवाह संपुष्टात येत नाही. तलाक तीन टप्प्यात दिला जातो. यात पती-पत्नीमध्ये पुनश्च समेट व्हावा, वाद संपवावे, समुपदेशन व्हावे, सामाजिक प्रतिष्ठितांना बोलावून मार्ग काढता यावे, नातेवाईकांमध्ये सुसंवाद निर्माण व्हावा असे अनेक पर्याय दिलेले आहेत.
पती हा कुटुंबाचा प्रमुख असल्याने त्याने कुटुंबाच्या भौतिक गरजा पुरविल्या पाहिजे. पत्नीवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम केले पाहिजे. पती-पत्नीने एकमेकांचा आदर केला पाहिजे. वैवाहिक जीवनातील समस्या प्रेमाने सोडवल्या पाहिजे असे इस्लाममध्ये म्हटले असल्याचे मजीद खान म्हणाले.
जमाते इस्लामी हिंद बीडचे जिल्हाध्यक्ष सय्यद इफ्तेखार यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम झाला. यावेळी एस. सौंदळे, सय्यद सालार, सय्यद सबाहत अली, शेख सलीम, शेख मुदस्सिर, प्रदीप भुकतर आदी उपस्थित होते. शेख अहमद यानी सुत्रसंचलन करून आभार मानले. शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Social Plugin