Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

गुणवत्तापुर्ण शिक्षणासाठी पालकांचा शिक्षण प्रक्रियेत सहभाग महत्वाचा--जेष्ठ पत्रकार प्रा. नानासाहेब गाठाळ


अंबाजोगाई // विद्यार्थी वर्गाच्या जडणघडणीत पालक, प्राध्यापक यांचा मोलाचा वाटा असतो. सद्यस्थितीत गुणवत्तापूर्ण शिक्षण निर्माण करावयाचे असेल तर विद्याथ्र्याबरोबरच पालकांचाही शिक्षण प्रक्रियेत सहभाग असणे महत्वाचे आहे. पालक महाविद्यालयीन शिक्षणाच्या वेळी विद्याथ्र्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत नंतर पश्चाताप होतो पालकांनीही खाजगी क्लासेसपेक्षा विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहतो की नाही याची माहिती घेऊन त्याच्या अभ्यासाकडे लक्ष ठेवावे म्हणजे गुणवत्ता वाढेल असे मत जेष्ठ पत्रकार प्रा. नानासाहेब गाठाळ यांनी व्यक्त केले
 येथील योगेश्वरी महाविद्यालयात १२ वी परीक्षेतील गुणवंतांच्या गौरव कार्यक्रमात ते बोलत होते
अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खूरसाळे होते
व्यासपीठावर कोषाध्यक्ष प्रा.माणिकराव लोमटे, सहसचिव प्रा.एस.के. जोगदंड,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यु.डी. जोशी उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोपात डॉ. खुरसाळे म्हणाले की, विद्यार्थी हा शोधक असल्यासच त्याच्यात गुणवत्ता निर्माण होते आणि पुढे शिक्षणाचा स्तर देखील उंचावतो.
यावेळी काही उपस्थित गुणवंतांनी, पालकांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या प्रास्तविकातून डॉ.यु.डी. जोशी यांनी हे महाविद्यालय  गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी  आग्रही असल्याने पालक, समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोण बदलल्याचे सांगितले
 कार्यक्रमाचे संचलन पर्यवेक्षक प्रा.डॉ. गणेश पिंगळे यांनी तर उपस्थितांचे आभार उपप्राचार्य डॉ.आर. व्ही. कुलकर्णी यांनी मानले. यावेळी पालक, गुणवंत विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.