परळी // नगर परिषदेकडून परळीत दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने पाण्याची साठवणूक करण्याची नागरिकांकडून धडपड करण्यात येत आहे. परळीत पाणी टंचाई ने उग्र रूप धारण केले असून पाणी भरण्याच्या धडपडीत लोकांना जीव गमवावा लागत आहे. आज दि. 10 रोजी सकाळी 8. 15 वा. सुमारास संजय राजाभाऊ विडेकर वय 48 रा. हालगे गल्ली परळी वैजनाथ. या इसमाचा हौदात उतरून पाणी भरत असताना मोटरीचा कंरट लागला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
नगर परिषदेकडून परळीत दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने पाण्याची साठवणूक करण्याची अनेक नागरिकांकडून धडपड करण्यात येत आहे. त्यात पाणीपुरवठा हा कमी दाबाने होत असल्यामुळे अश्या घटना घडत आहेत .
पाणी मोटार लावून पाणी भरताना वीजप्रवाह हौदावरील मोटारीत उतरल्याने शाॅक लागून यांचा जागीच मृत्यू झाला आहे .
नगराध्यक्षा यांच्या प्रभागात घडलेली ही दुर्दैवी घटना आहे. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. मयत हा पानटपरी चालवून उदरनिर्वाह करत होता. त्यांच्या मृत्यूने कुटुंबचा आधार गेला आहे.पाणी टंचाईच्या परिस्थितीने या व्यक्तीचा बळी घेतला असून हालगे गल्ली भागातील नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे.
Social Plugin