परळी // पाण्याची नगरी म्हणून ओळख असणाऱ्या परळी शहरासाठी पूर्वी दररोज दोन वेळा नगर परिषद मार्फत पाणी पुरवठा होत होता. परळी व परिसरातील गावाना पाणी पुरवठा करणाऱ्या नागापूर येथील वाण प्रकल्पा च्या पाणलोट क्षेत्रात अपुरा पाऊस झाल्याने .पहिल्यांदाच परळी नगर परिषद मार्फत दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.
या पूर्वी औष्णिक विदयुत केंद्रांचे सर्व संच पूर्ण क्षमतेने तसेच साखर कारखाना व इतर प्रकल्प सुरु असतानाही कधीही पाणी टंचाई जाणवली नाही . भविष्यातील वाढती लोकसंख्या, शहराचे होणारे विस्तारीकरण, निर्माण होणारे नवउद्योग व तीव्र पाणीटंचाई वर मात करण्यासाठी तसेच आजूबाजूच्या परिसरातील पर्यावरण जोपासण्यासाठी नागापूर येथील वाण प्रकल्पा सारखा दुसरा साठवण तलाव निर्माण करण्याची मागणी चेतन सौंदळे यांच्यासह भालचंद्र तांदळे,अनिष अग्रवाल,रमेशअप्पा सपाटे,चंद्रकांत उदगीरकर,विठ्ठलराव घोडके,अरूण वानरे,सुभाषराव डुबे,अभय लोणीकर,शैलेश आवीॆकर,सुधीर ओपळे,योगेश हलकंचे यांनी केली आहे.
Social Plugin