दिल्ली //
पाकिस्तानात शिरुन भारतीय हवाई दलाने पाक व्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या हल्ल्याचा मुख्य बेस हा पंजाबमधील आदमपूर येथील हवाई स्थळातून करण्यात आला.
मिराज २००० या विमानाचा सर्वात मोठा तळ ग्वालियर येथे आहे. श्रीनगर अथवा काश्मीरमधील कोणत्याही हवाई तळाचा वापर करण्याऐवजी पंजाबमधील आदमपूर तळाचा वापर करण्यात आला. यापूर्वी कारगील युद्धात १९९९ मध्ये या तळावरुनच कारगीलच्या उंच पहाडावर बसलेल्या पाकिस्तानी सैनिकांच्या ठिकाणावर हल्ला करण्यासाठी वापर केला होता. त्यावेळी मिराज विमानांनी भारतीय हवाई हद्द ओलांडली नव्हती. मात्र, आज पहाटे केलेल्या हवाई हल्ल्यात मिराज विमानांनी नियंत्रण रेषा ओलांडून हा हल्ला केला आहे.
बस सेवा सुरु करुन ठेवले अंधारात
पुलवामा हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीर आणि काश्मीरमधील बस सेवा स्थगित करण्यात आली होती. आठवडा भर बंद करण्यात आलेली ही बस सेवा सोमवारीच पुन्हा सुरु करण्यात आली होती. मुज्जफराबाद येथे बस रवाना झाली होती. तसेच अन्य तीन बस सेवा सुरु करण्यात आली होती. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई होणार नाही. असे वातावरण तयार करण्यात सुरु झाली होती, असे असताना पहाटे मुज्जफराबाद येथेच हा हल्ला करण्यात आला.
Social Plugin