प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे उसतोडमजूरच्या एका निरपराध मुलीचा बळी गेला..
सिरसाळा// वडवणी तालुक्यातील ब्रम्हनाथ तांड्यावरील स्वाती गोविंद राठोड हिने शाळेतील भामटय़ां मुलांकडून होणाऱ्या नेहमीच्या छेडछाडील वैतागून आत्महत्या केल्याची दूर्देवी घटना नूकतीच घडली आहे. स्वाती राठोड च्या मृत्यूला जबाबदार असलेल्या सर्व आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्या वर कडक कारवाई करावी या मागणीसाठी सिरसाळा येते विधार्थानी निवेदना द्वारे केली आहे़. अन्यथा बीड जिल्हय़ातील विधार्थी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करतील असा इशारा एस एफ आय चे राज्य सहसचिव अमोल वाघमारे यानी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री,शिक्षण मंत्री, बीडचे जिल्हाधिकारी, बीडचे पोलीस अधीक्षक यांना दिला आहे.या बाबतीत अधिक माहिती अशी की, वडवणी तालुक्यातील ब्रम्हनाथ तांड्यावर स्वाती राठोड आपल्या आई सोबत राहत होती. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने स्वातीचे वडील गोविंद राठोड उसतोडणी साठी कर्नाटक राज्यात गेले आहे.स्वाती तेलगाव येथील सरस्वती विद्यालयात नववीच्या वर्गात शिकत होती. गरीबीची परिस्थिती असताना देखील शिक्षणची आवड असल्याने स्वाती दररोज मिळेल त्या वाहनाने शाळेत जात असे.
प्रवासा दरम्यान व शाळेच्या परिसरात दोन तीन मुले तिची नेहमी छेड काढायचे, तिला चढवायचे. हा प्रकार मागील अनेक दिवसा पासुन सुरु होता.छेडछाड व त्रासाची कल्पना स्वातीने शाळेचे मुख्याध्यापक,संबंधित शिक्षक तथा पोलीस ठाण्यात दिली होती. वारंवार होणाऱ्या छेडछाडीची दखल “शाळेचं झोपलेलं प्रशासन”, “....पोलीस खात्याने” गांभीर्याने घेवून छेडछाड करणाऱ्या मुलांचा जर वेळीच बंदोबस्त केला असता तर स्वाती राठोड या निरागस निरपराध युवतीवर हे सुंदर जग सोडून जाण्याची वेळ आली नसती. स्वातीच्या मृत्यूला जेवढे दोन मुले जिम्मेदार आहेत तेवढेच जिम्मेदार शाळेचे मुख्याध्यापक, पोलीस स्टेशनचे अधिकारी देखील आहेत.याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या वेळी करण्यात आलीआहे.
18 जानेवारी रोजी चाचणी परिक्षेची माहीती मिळाल्याने स्वाती शाळेत गेली होती.परत घरी येतांना नेहमीच छेड काढणारे मुलानी तिची छेडछाड सुरू करून तिच्या घरा पर्यंत पाठलाग केला होता. आपणास होणारा त्रास, वारंवार होणारी आपली छेडछाड या बाबतीत अनेक वेळेस शाळेत तक्रार देवूनही कोणी दखल घेत नाही, गुन्हेगारावर कारवाई होत नाही, त्यामुळेच स्वाती निराश झाली, भयभीत झाली. या नैराश्येतून तिने विषारी औषध प्राशन केले. आई शेतातून आल्यावर स्वातीला दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान ति मरण पावली… एका निरपराध मुलीचा प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बळी गेला..या घटनेमळे विधार्थ्यात संतापाची लाट पसरली असून या घटनेचा महाराष्ट्रभर तिव्र निषेध करण्यात येत आहे.
Social Plugin