गुरुजी गेले वाहून, सर आले धावून.,.....
गुरुजी कुठे गेले आणि सर कुठून आले ? ही चर्चा करताना आपल्याला गुरुकुलातल्या ऋषीपासून आजच्या online शिक्षक इथपर्यंतचा आढावा घ्यावा लागेल. गुरुकुलातल्याशिक्षकाचे जीवन,भावविश्व हे एकच होते. दोघेही एकत्रच राहत होते. सकाळपासून झोपेपर्यंत शिक्षक शिक्षकाचे कुटुंब आणि विद्यार्थी हे सारे एकत्रच राहत होते..त्या काळापासून आज आपण online पर्यंत आणि शिक्षक नसण्यापर्यंत आपण प्रवास केला आहे. थोडक्यात जसजशी मानवी प्रगति होत गेली तसतसा शिक्षकाचा रोल हा मर्यादित होत गेला. आयुष्यात पूर्णवेळ शिक्षक असण्यापासून तर काही काळ शिक्षक असण्यापर्यंत हे आकुंचन होते आहे.
गुरुजी कुठे गेले आणि सर कुठून आले ? ही चर्चा करताना आपल्याला गुरुकुलातल्या ऋषीपासून आजच्या online शिक्षक इथपर्यंतचा आढावा घ्यावा लागेल. गुरुकुलातल्याशिक्षकाचे जीवन,भावविश्व हे एकच होते. दोघेही एकत्रच राहत होते. सकाळपासून झोपेपर्यंत शिक्षक शिक्षकाचे कुटुंब आणि विद्यार्थी हे सारे एकत्रच राहत होते..त्या काळापासून आज आपण online पर्यंत आणि शिक्षक नसण्यापर्यंत आपण प्रवास केला आहे. थोडक्यात जसजशी मानवी प्रगति होत गेली तसतसा शिक्षकाचा रोल हा मर्यादित होत गेला. आयुष्यात पूर्णवेळ शिक्षक असण्यापासून तर काही काळ शिक्षक असण्यापर्यंत हे आकुंचन होते आहे.
गुरुकुल परंपरा संपली , नंतर खेडेगावात शिक्षक आणि विद्यार्थी पहाटेपासून रात्रीपर्यंत एकत्रच असत.शिक्षक आणि मुले जरी वेगवेगळे राहिली तरी रात्री मुले शाळेत झोपायला येत.शिक्षक त्यांना पहाटेच अभ्यासाला उठवत असत. पहाटे उठले की कंदिलाच्या उजेडात शिक्षक मुलांना जागवत. सकाळीव दुपार सत्रात शाळा चालत असत. संध्याकाळी खेळ आणि रात्री मुले पुन्हा शाळेत झोपायला.गुरुकुल थोडे पातळ यात झाले. यात ते शिक्षक त्या गावात राहत होते.त्या गावात राहताना ते शिक्षक त्या गावाचे भाग बनलेले असत..ते शिक्षकत्या खेड्याचे शहाणपण असत.त्या खेड्यातील लग्नाच्या बैठका त्या शिक्षकाशिवाय होत नसत. गावात कोणी आजारी पडले तर हाच शिक्षक झाड पाल्याचे औषधे देत असे. कुणी पेशंट गंभीर झाला तर त्याच्यासोबत तालुक्याला जात.गावातील सारी भांडणे याच्या शिवाय मिटत नसत.शिक्षक हेच भाऊबंदकीच्या भांडणात कोर्ट होते. शिक्षक त्याच नोकरीच्या गावात राहत असे.
त्यांची मुले त्यांना आमच्यासारखी खाजगी शाळेत तालुक्याला शिकविणे शक्य असूनही त्यांनी गावातच शिकवली.या शिक्षकांनी आपल्या कुटुंबाला तालुक्याच्या गावी ठेवणे शक्य असूनही नोकरीच्या त्या खेड्यात तमाम गैरसोयी झेलत फिरवले..त्यांच्या बायकांनीही त्याबाबत तक्रार केली नाही.‘पिंजरा’ चित्रपटातील दाखवलेला पूर्वार्धातील मास्तर म्हणजे हा शिक्षक होता. बनगरवाडीत रंगवलेला आणि ‘माझी काटेमुंढरीची शाळा’ या पुस्तकातील नायक हे जणू त्या पिढीच्या शिक्षकाचेच वर्णन आहे. आजचा शिकलेला महाराष्ट्र या अशा गुरुजींच्या खांद्यावर उभा आहे. या शिक्षकांनी केलेल्या समर्पणावर आजचा महाराष्ट्र देशातील प्रगत राज्य झाला आहे. केवळ याचे श्रेय हरित क्रांती आणि औद्योगिक क्रांतीला नाही हे लक्षात घेण्याची गरज आहे. या गुरुजींचे शिक्षण कमी होते पण त्यांच्यातील समर्पणाने त्यांच्या त्या मर्यादेवर मात केली.आज ज्या शिक्षकांचे नंबर मेडीकल इंजिनियरिंगला लागू शकले असते अशी मुले प्राथमिक शिक्षक झाली आहेत.तर दुसरीकडे लिहिता वाचता न येणार्या मुला मुलींची संख्या वाढते आहे. याउलट मागच्या पिढीत शिक्षक अतिशय कमी शिकलेले होते. ते इंग्रजीही शिकलेले नसत पण धोतर,कोट,टोपी घालणारे ते शिक्षक ‘देवा तुझे किती सुंदर आकाश’ ही प्रार्थना म्हणत दिवस सुरू करत आणि हातात घड्याळ नसलेली ती माणसं रात्री मुले झोपेपर्यंत कामच करत राहत .तेव्हाची ती तळमळ ही आजच्या या हुशार मुलामध्ये कशी आणायची..? कोणी संक्रमित करायची ? पण त्याच जुन्या शिक्षकांच्या हाताखालीच मुले खर्या अर्थाने घडली.. हे असं का घडतयं ?ही विसंगती कशी समजून घ्यायची...??
हळूहळू शिक्षणाचे सार्वत्रीकरण झाले.‘गाव तिथे एसटी’ आणि गाव तिथे शाळासुद्धा आली. एकागावातला आयुष्यभर राहणारा शिक्षक हे चित्र बदलून गेलं. सरकारने नेमलेले शिक्षक गावोगावी आले.गावाचे आणि शाळेचे, गावाचे आणि शिक्षकांचे नातेच बदलून गेले. जसा गावात ग्रामसेवक बदलून यायचा,जसा गावात आरोग्य कर्मचारी बदलून यायचा ,जसा गावात तलाठी यायचा तसा आता शिक्षक ही येऊ लागला. परगावाहून दूर जिल्ह्यातून तो येऊ लागला. कोकणात आणि विदर्भात स्थानिक शिक्षक अपेक्षित अर्हता धारक नव्हते त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातून शिक्षक तिथे जाऊ लागले आणि ज्या दिवशी हजर झाले त्या दिवसापासून बदलीचा प्रयत्न करू लागले. बदली होऊन आलेल्या शिक्षकाचे नकळत कर्मचारीवर्गात रुपांतर झाले. त्यात पुन्हा नोकरीच्या गावात राहण्याची गैरसोय बघून आणि मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षक मोठ्या गावात राहू लागले. तालुक्याच्या गावी मोठ्या संख्येने शिक्षक राहतात. त्यातून जुनी गुरुजींची प्रतिमा बदलून गेली. त्यातून गावाशी शिक्षकांचे नाते मर्यादित झाले.शिक्षक जेव्हा गावात येतात तेव्हा गावकरी शेतात कामाला गेलेले असतात आणि गावकरी संध्याकाळी गावात येतात तेव्हा शाळा सुटून गेलेली असते आणि शिक्षक तालुक्याला गेलेले असतात. त्यातून गावाशीअसलेले त्याचे नाते हे मर्यादित झाले.
पूर्वी गावाचे शहाणपण असलेला हा शिक्षक आता फक गावातील एक कर्मचारी उरला. त्याला आणखी एक पैलू होता. गावपातळीवरराजकारण गटबाजी वाढली. गावाची शाळा ही त्यातून सुटेना. या वाढत्या राजकारणात गावातील राजकारणापासून शिक्षक शांत राहीले...त्याच्या लक्षात आले की आपण सुखाने नोकरी करण्यासाठी आपण आता गप्प राहिलो पाहिजे.त्यातून शिक्षक गावातीलभानगडीपासून गप्प राहिले किंवात्यांनी सुटका करून घेतली.
शिक्षकांनी आपली सुटका फक्त केवळ गावातील राजकारणातूनच करून घेतली नाही..तर सामाजिक चळवळीतून स्वत:ची सुटका करून घेतली आहे. आज शिक्षक समुदायाबद्दल जे प्रश्न उपस्थित केले जातात त्याविषयी बोलले पाहिजे. महाराष्ट्रात एक काळ असा होता की सर्व सामाजिक चळवळी सांस्कृतिक चळवळी यात शिक्षक वर्गाने पुढाकार घेतला.अनेक चळवळींचे नेतृत्व शिक्षकच करीत होते.याचे एक कारण जे जे शिक्षक होते ते ते सारे एका ध्येयवादाने शिक्षक झालेले होते.त्या ध्येयवादाने हे सारे शिक्षक सामाजिक चळवळीत सामील होत होते. साने गुरुजींच्या प्रेरणेने आणि स्वातंत्र्यचळवळीच्या प्रभावातून महाराष्ट्रात हजारो तरुणांनी शिक्षक होण्याचे ठरविले. हे तरुण उच्च अधिकारी होऊ शकले असते किंवा कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकले असते.पुन्हा शिक्षक होण्यात त्या काळात आर्थिकआकर्षण अजिबात नव्हते तरीही तो विचार त्यांनी केला नाही. साने गुरुजींची ‘धडपडणारी मुले’ म्हणून असे शिक्षक ओळखले जात होते. अशा शिक्षकांनी शाळेतही उत्तम शिकवले आणि सामाजिक कार्यातही ते सहभागी झाले.नरहर कुरुंदकर,राम शेवाळकर,ना.य.डोळे असे अनेक शिक्षक त्याआर्थाने प्रसिद्ध आहेत. पण आज शिक्षक सामाजिक कार्यात भाग घेत नाहीत,चळवळीचे नेतृत्व करीत नाहीत याचे कारण ते मुळातच त्या जुन्या ध्येयवादातून शिक्षक झालेले नाहीत.त्यामुळे ते तसे नाहीत. शिक्षकांच्या बांधिलकीवर टीका करताना ही शिक्षकांची भरती कशी झाली ?हे लक्षात घेतले पाहिजे.
शिक्षकांनी आपली सुटका फक्त केवळ गावातील राजकारणातूनच करून घेतली नाही..तर सामाजिक चळवळीतून स्वत:ची सुटका करून घेतली आहे. आज शिक्षक समुदायाबद्दल जे प्रश्न उपस्थित केले जातात त्याविषयी बोलले पाहिजे. महाराष्ट्रात एक काळ असा होता की सर्व सामाजिक चळवळी सांस्कृतिक चळवळी यात शिक्षक वर्गाने पुढाकार घेतला.अनेक चळवळींचे नेतृत्व शिक्षकच करीत होते.याचे एक कारण जे जे शिक्षक होते ते ते सारे एका ध्येयवादाने शिक्षक झालेले होते.त्या ध्येयवादाने हे सारे शिक्षक सामाजिक चळवळीत सामील होत होते. साने गुरुजींच्या प्रेरणेने आणि स्वातंत्र्यचळवळीच्या प्रभावातून महाराष्ट्रात हजारो तरुणांनी शिक्षक होण्याचे ठरविले. हे तरुण उच्च अधिकारी होऊ शकले असते किंवा कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकले असते.पुन्हा शिक्षक होण्यात त्या काळात आर्थिकआकर्षण अजिबात नव्हते तरीही तो विचार त्यांनी केला नाही. साने गुरुजींची ‘धडपडणारी मुले’ म्हणून असे शिक्षक ओळखले जात होते. अशा शिक्षकांनी शाळेतही उत्तम शिकवले आणि सामाजिक कार्यातही ते सहभागी झाले.नरहर कुरुंदकर,राम शेवाळकर,ना.य.डोळे असे अनेक शिक्षक त्याआर्थाने प्रसिद्ध आहेत. पण आज शिक्षक सामाजिक कार्यात भाग घेत नाहीत,चळवळीचे नेतृत्व करीत नाहीत याचे कारण ते मुळातच त्या जुन्या ध्येयवादातून शिक्षक झालेले नाहीत.त्यामुळे ते तसे नाहीत. शिक्षकांच्या बांधिलकीवर टीका करताना ही शिक्षकांची भरती कशी झाली ?हे लक्षात घेतले पाहिजे.
आज शिक्षकांवर मोठ्या प्रमाणात टीका केली जाते.शिक्षक केवळ आर्थिक विचार करतात.शिक्षक ज्ञानसाधना करत नाहीत.इतर व्यवसाय करतात.व्यासंग करीत नाहीत असे अनेक आरोप केले तर त्यांच्या वर्तनावर टीका केली जाते.पणत्यातीलअनेकशिक्षकया प्रकारच्या ध्येयवादाने शिक्षक झालेले नव्हते हे लक्षात घेतले पाहीजे. महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. एक लाखापेक्षा जास्त प्राथमिक शाळा, २० हजारपेक्षा जास्त माध्यमिक शाळा,शेकडो कॉलेज आणि तितक्याच गावोगावी निघालेल्या व्यवसाय शिक्षणाच्या संस्था. यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षक नोकऱ्या उपलब्ध झाल्या. या नोकरीसाठी आवश्यक असणारी डीएड,बीएड कॉलेज २००० च्या दशकात प्रत्येक तालुक्या तालुक्यात निघाली. अगोदरच शेतीत रोजगाराच्या नाही.व्यवसाय करावे तर ग्रामीण भागात मार्केट नाही ,बँक भांडवल देत नाही आणिमार्गदर्शन नाही. पुन्हा मराठी मनाचा कल हा जोखीम घेण्याचा नाही. आणि प्रत्येक तालुक्यात महाविद्यालय निघाल्याने किमान १२ वी किंवा पदवीधर मुले सहजपणे झाली व त्यांनी हक्काची शिक्षकाची नोकरी मिळेल म्हणून डीएड बीएड करायला सुरुवात केली. अनेकांना नोकरी मिळू लागल्याने डीएड बीएड चा बाजार वधारला आणि त्यात डोनेशन सुरु झाले. इमारत धड नाही. प्रशिक्षित शिक्षक स्टाफ नाही. अशा स्थितीत डीएड बीएड सुरु झाले .यातील शिक्षणसम्राटांनी या मुलांचे शोषण केले. अनेक पालकांनी जमिनी विकल्या अशी उदाहरणे होती.
ज्या महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नीने गळ्यातले मंगळसूत्र मुलांसाठी गहाण ठेवले त्याच महाराष्ट्रात शिक्षणसम्राटांनी मुलांच्या आईला गळ्यातील मंगळसूत्र विकायची वेळ आणली.पुन्हा अशा संस्थातून शिक्षक झालेल्यांना नोकरीसाठीही पैसे मोजावे लागले. खाजगी शिक्षणसंस्थांनी जातवार राजकीय सोयीनुसार शिक्षकभरती केली. तीभरती करताना त्यांनी हायस्कूल व महाविद्यालयात शिक्षक भरताना लाखो रुपये घेतले. तेव्हा डीएड बीएड च्या नोकरीला डोनेशन आणि आता नोकरीसाठी ही पैसे. पुन्हा शासकीय मान्यतेसाठीही पुन्हा लाच. अशा आर्थिक नाडलेल्या शिक्षक तरुण तरुणीत ध्येयवाद उरला नाही. अशा कालखंडात शिक्षक म्हणून लागलेले शिक्षक हे अति व्यावहारिक झाले. त्यांना ध्येयवाद वगैरे शब्द हे चेष्टेचे विषय वाटायला लागले. ते थट्टा करू लागले. या आर्थिक ध्येयशून्य लाचखोरीच्या पुरात गुरुजी वाहून गेले आणि सर फक्त उरले...
राजकीय नेत्यांना शिक्षकाविषयी अजिबात आदर नव्हता. त्यांनी शिक्षकांना कायम वस्तु म्हणून वापरले. शिक्षक भरती करताना कोणत्या गावातून किती मते या निकषावर केली. पुन्हा त्यांच्या निवडणूक प्रचारात अगदी पैसे वाटण्यापासून शिक्षकांना कामे करावी लागतात. शिक्षक मुक्कामी अनेक गावी ठेवले जातात. खुनशीने बदल्या केल्या जातात आणि नोकरी लावण्यापासून नेत्याच्या वाढदिवसापासून सतत पैसे मागितले जातात.
राजकीय नेत्यांना शिक्षकाविषयी अजिबात आदर नव्हता. त्यांनी शिक्षकांना कायम वस्तु म्हणून वापरले. शिक्षक भरती करताना कोणत्या गावातून किती मते या निकषावर केली. पुन्हा त्यांच्या निवडणूक प्रचारात अगदी पैसे वाटण्यापासून शिक्षकांना कामे करावी लागतात. शिक्षक मुक्कामी अनेक गावी ठेवले जातात. खुनशीने बदल्या केल्या जातात आणि नोकरी लावण्यापासून नेत्याच्या वाढदिवसापासून सतत पैसे मागितले जातात.
अशा संस्थातील शिक्षकांना आपण आदर्शवाद सांगणार ?
त्यात पुन्हा शासनाची धोरणे ही शिक्षकातला गुरुजी मारणारीच होती. कोणत्याही सरकारला हाताखाली माणसे नको असतात तर मशीन किंवा पपेट हवी असतात .त्यांना स्वतंत्र्य व्यक्ति नकोच असतात त्यातून शिक्षकाचे व्यक्तिमत्व एक कर्मचारी म्हणूनच राहील अशी शासनाने काळजी घेतली ... शिक्षक हा वेळापत्रक आणि एका चरकात असा बांधला की नकळत त्याचा कर्मचारी होत गेला. कृष्णकुमार म्हणतात त्याप्रमाणे घंटा वाजली की तो वर्गात जातो दुसरी घंटा वाजली की तो बाहेर येतो यातून तो यांत्रिक होतो.पुन्हा शासनाच्या विना अनुदानित धोरणाने तर आज जे कोणी शिक्षक होण्यासाठी या क्षेत्रात आले त्यांच्यातील उर्जाच मारून गेली. १०० आंदोलने करून २० ते २५ वर्षे विना अनुदानित काम करणार्या शिक्षकांच्या नजरेला नजरही देण्याची हिंमत होत नाही. आज एकाच कामासाठी शाळा महाविद्यालयात दोन प्रकारचे शिक्षक आहेत. एक पूर्णपगारी आणि तासिका तत्वावरील शिक्षक. त्यांनी हे अन्याय झेलताना कसे आदर्श झेलावेत पुन्हा छोट्या छोट्या कामासाठी अधिकारी सतत पैसे मागितले जातात त्यातून शिक्षकातील आदर्शवाद मरत गेला.
पण पुन्हा हे ही अर्धेच विश्लेषण होईल.शिक्षणातला ध्येयवाद मारायला फक्त एवढे एकच कारण नव्हते. हे शिक्षक झालेले हे तरुण तरुणी काही सर्वच आर्थिक झळ बसलेले नव्हते किंबहुना १९९५ पूर्वी नोकरीत आलेल्यांना हा त्रास फारसा झालेला नव्हता. तरीही त्यांच्यातही फारसा ध्येयवाद का नव्हता ? याचीही चर्चा करायला हवी. मुळात हे झालेले शिक्षक यापूर्वी म्हणालो तसे सर्वच काही साने गुरुजी परंपरेच्या ध्येयवादातून आलेले नव्हते..त्यातही पुन्हा महाराष्ट्रातील शिक्षणाचा दर्जा हा यथातथाच होता. शाळेत हे शिक्षक जेव्हा विद्यार्थी होते तेव्हा काही फार ध्येयवाद शिकवला जाईल,मुलांना वाचन करायला, चर्चा करायला, बौद्धिक प्रेरणा दिली जाईल अशा प्रकारचे उपक्रम फार काही घेतले जात नव्हते.
त्यात पुन्हा शासनाची धोरणे ही शिक्षकातला गुरुजी मारणारीच होती. कोणत्याही सरकारला हाताखाली माणसे नको असतात तर मशीन किंवा पपेट हवी असतात .त्यांना स्वतंत्र्य व्यक्ति नकोच असतात त्यातून शिक्षकाचे व्यक्तिमत्व एक कर्मचारी म्हणूनच राहील अशी शासनाने काळजी घेतली ... शिक्षक हा वेळापत्रक आणि एका चरकात असा बांधला की नकळत त्याचा कर्मचारी होत गेला. कृष्णकुमार म्हणतात त्याप्रमाणे घंटा वाजली की तो वर्गात जातो दुसरी घंटा वाजली की तो बाहेर येतो यातून तो यांत्रिक होतो.पुन्हा शासनाच्या विना अनुदानित धोरणाने तर आज जे कोणी शिक्षक होण्यासाठी या क्षेत्रात आले त्यांच्यातील उर्जाच मारून गेली. १०० आंदोलने करून २० ते २५ वर्षे विना अनुदानित काम करणार्या शिक्षकांच्या नजरेला नजरही देण्याची हिंमत होत नाही. आज एकाच कामासाठी शाळा महाविद्यालयात दोन प्रकारचे शिक्षक आहेत. एक पूर्णपगारी आणि तासिका तत्वावरील शिक्षक. त्यांनी हे अन्याय झेलताना कसे आदर्श झेलावेत पुन्हा छोट्या छोट्या कामासाठी अधिकारी सतत पैसे मागितले जातात त्यातून शिक्षकातील आदर्शवाद मरत गेला.
पण पुन्हा हे ही अर्धेच विश्लेषण होईल.शिक्षणातला ध्येयवाद मारायला फक्त एवढे एकच कारण नव्हते. हे शिक्षक झालेले हे तरुण तरुणी काही सर्वच आर्थिक झळ बसलेले नव्हते किंबहुना १९९५ पूर्वी नोकरीत आलेल्यांना हा त्रास फारसा झालेला नव्हता. तरीही त्यांच्यातही फारसा ध्येयवाद का नव्हता ? याचीही चर्चा करायला हवी. मुळात हे झालेले शिक्षक यापूर्वी म्हणालो तसे सर्वच काही साने गुरुजी परंपरेच्या ध्येयवादातून आलेले नव्हते..त्यातही पुन्हा महाराष्ट्रातील शिक्षणाचा दर्जा हा यथातथाच होता. शाळेत हे शिक्षक जेव्हा विद्यार्थी होते तेव्हा काही फार ध्येयवाद शिकवला जाईल,मुलांना वाचन करायला, चर्चा करायला, बौद्धिक प्रेरणा दिली जाईल अशा प्रकारचे उपक्रम फार काही घेतले जात नव्हते.
जे कृष्णमुर्ती म्हणतात तसे ‘आजचे शिक्षण विचार कसा करावा ? हे शिकवत नाही तर काय विचार करावा हे रेडीमेड शिकवते. ते म्हणतात “आजचे शिक्षण what to think शिकवते पण how to think शिकवत नाही.”यामुळे शिक्षणाच्या केवळ पाठांतरपद्धतीने शिकलेल्या आणि इतर कोणतेही सामाजिक उपक्रम न शिकलेल्या विद्यार्थ्यांना शाळेतून मार्क मिळाले ,पदव्या मिळाल्या पण कोणताच ध्येयवाद मिळाला नाही. त्यामुळे वाईट शिक्षणातून वाईट विद्यार्थी आणि वाईट विद्यार्थ्यांतून घडणारे पुन्हा वाईट शिक्षक आणि त्यांच्या हाताखाली पुन्हा सुमार विद्यार्थी असे हे दुष्टचक्र आहे. त्यातून एकूण शिक्षणाचा सरासरी दर्जाच खाली आला.
ध्येयवाद सोडाच पण किमान व्यावसायिक बांधिलकी तरी उरावी ना ? पण ती ही घसरत घसरत गेली. दत्ता सावळे नावाचे एक विचारवंत म्हणायचे की १८ वर्षाची एक अल्लड तरुणी लग्न झाल्यावर आई होते आणि तिचे मूल हे मूल म्हणून विकसित होताना तिच्यातील तरुणी ही आई म्हणून विकसित होते त्याप्रमाणे विद्यार्थी हा विद्यार्थी म्हणून विकसित होताना शिक्षक हा शिक्षक म्हणून विकसित झाला पाहिजे पण आपल्या व्यवस्थेत नोकरीला लागणारा शिक्षक निवृत्त होताना त्याची वैचारिक किंवा इतर कुवत उंचावली असे अजिबात अपवाद वगळता का दिसत नाही ?? नोकरीत माणसे अधिक बनचुकी होत जातात. ती फुलत नाहीत उलट कोमेजून जातात.. आचार्य रजनीश म्हणायचे “आज शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या ज्ञानात फक्त एक तासाचे अंतर आहे.तो अगोदर एक तास अगोदर नोट्स वाचतो आणि मुलांना माहिती देतो त्यामुळे त्याने त्या पलीकडे जावून जिज्ञासेचे माध्यम बनले पाहिजे “पण हा व्यासंग शाळेतील शिक्षकांचा सोडाच पण महाविद्यालयीन स्तरावरही फारसा उरला नाही. रजनिश म्हणतात तशीच बहुतेक ठिकाणी अवस्था आहे.अभ्यासक्रम बदलला तरच नोटस बदलल्या जातात..वर्गात प्रतिभेला स्पर्श करील असे काहीच व्याख्यानात नसते. त्या नोटसच्या आधारेच शिकवले जाते आणि त्याच लिहून दिल्या जातात. त्यामुळे विद्यार्थी ही व्यासंगी होत नाहीत किंवा त्यांना वाचनाची किंवा इतर व्यासंगी आवड लागत नाही. प्राध्यापकांच्या पीएचडी, त्यांच्या conference हे सारे विषय पुन्हा पुन्हा आपल्याला ‘गुरुजी गेले वाहून’ याचीच आठवण करून देतात.. तेव्हा कामाचा आणि वेतनाचा परस्पर संबंध नसेल तर शिक्षणाची किती भयंकर अवस्था होते हे महाविद्यालयीन शिक्षणाकडे बघून पटते.
प्राथमिक शाळा ते महाविद्यालयीन शिक्षण यात गुणवत्ता घसरण्याचे आणि शिक्षकात शैथिल्य येण्याचे एक महत्वाचे कारण हे आहे की शिक्षकाचे काम मोजण्याची कोणतीच प्रक्रिया शिक्षणात नाही त्यामुळे ‘सब घोडे बारा टक्के’ अशी स्थिती झाली आहे. चांगल्याचे कौतुक नाही आणि वाईटाला शिक्षा नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे चांगले काम करणारा शिक्षकही हळूहळू इतरांसारखा होत जातो. काम आणि वेतन यात जे नाते असायला हवे तेच नसल्याने काम हे मूल्यमापनात महत्वाचे ठरत नाही. त्यातून मग नोकरीत स्थिरावला की मग शैथिल्य येते आणि व्यासंग करावासा वाटत नाही. पुन्हा व्यासंग घटण्याचे आणि काम उत्कृष्ट करावेसे वाटत नाही याचे आणखी एक कारण समोर बसलेला शिक्षणातला ग्राहक असलेला विद्यार्थी हा शिक्षकाचे मूल्यमापन करायला असमर्थ आहे. त्यामुळे इतर व्यवसायात ग्राहकाचे जे दडपण येते तसे शिक्षकावर येत नाही . दुकानदाराने भेसळयुक्त माल विकला तर चर्चा होते आणि टी गिर्हाइक पुन्हा येणार नाही. दुधात पाणी टाकून विकले तर ते दूध नंतर विकले जात नाही कारण ते घेणारे ग्राहक जागृत आहे पण शिक्षणात दूध म्हणून पाणी दिले गेले तरीसुद्धा काहीच फरक पडत नाही कारण ते ओळखाण्याची क्षमता मुलामध्ये नसते आणि ज्या पर्यवेक्षीय यंत्रणेने हे मूल्यमापन करायला हवे शिक्षकांना मार्गदर्शन करायला हवे ती त्याचे काम रामशास्त्री बाण्याने मूल्यमापन करीत नाही.सगळे एकमेकांना सांभाळून घेतात.
गोपनीय अहवाल लिहिले जातात पण ते अहवाल हे केवळ कर्मकांड उरले आहेत. महाविद्यालयीन प्राध्यापकांना तपासायला अनेक निकष आले पण त्या निकषाइतकी ऊंची वाढविण्यापेक्षा ते निकषच पातळ करण्याकडे अनेकांनी लक्ष दिले. आंतरराष्ट्रीय दर्जाची मासिके गल्ली बोळातून निघू लागली,conference हे केवळ महाविद्यालयीन खर्चाने झालेले पर्यटन ठरले आणि नक ची तपासणी हे वार्षिक सेलिब्रेशन ठरले. महाविद्यालयीन शिक्षणाचा दर्जा घसरत गेला आणि पगार मात्र वाढत गेले. माझ्यासकट आमची सारी टीका प्राथमिक शिक्षणावर असते कारण त्या शाळा खेड्यापाड्यात असल्याने सर्वच समाज त्याकडे सूक्ष्मदर्शकातून बघतो, गुरुजी कधी येतो यावर लक्ष ठेवतो पण या महाविद्यालयात कामकाज कसे काय चालते ? हे समाजाला समजत नाही किंवा ते लक्षही देत नाही. त्यामुळे वर्षातील किती दिवस काम चालते ? तास होतात का ? व्यासंग आणि पीएचडी चा दर्जा काय ?conference मधून समाजाच्या हिताची काय चर्चा झाली ? हे समाजाला कळत नाही की समाजही उत्सुक नाही.
‘शिक्षक हा दरिद्रीच असला पाहिजे’ असा एक शोधनिबंध फारपूर्वी महाराष्ट्रात चर्चिला गेला होता. शिक्षक हा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसताना समाजाशी खूप जोडलेला होता आणि आता तो जसजसा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाला तसतसा तो समाजापासून तुटून गेला. एक जुने संस्थाचालक पूर्वी शिक्षण संघटनेचे नेते होते. त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांचे एक संस्थेतील शिक्षकांसमोर भाषण मी ऐकले. अतिशय व्यथित होऊन ते म्हणाले की संघटनेच्या माध्यमातून आम्ही शिक्षकांचे पगार वाढवा म्हणून संघर्ष केला, शिक्षकांचे पगार बँकेत करा म्हणून शिक्षकाला स्वयंपूर्ण पूर्ण केले पण तीच आज चूक झाली की काय ? असे आता मला वाटते आहे. मला त्यांचे शल्य समजू शकते. संघटनेच्या माध्यमातून शिक्षक नोकरीत स्थिर झाले पण त्या स्थिरतेने समाजाची शिक्षणाची आणि सर्वात जास्त शिक्षकाच्या स्वत:च्याच विकासाची खूप नुकसान केली. सुरक्षिततेने शिक्षक समूह हा अधिक स्थितीवादी झाला. अधिक व्यासंगहीन झाला आणि आर्थिक स्थैर्याने तर त्याची जगण्याची दिशाच बदलली.. शरद जोशी म्हणतात “ विचार करायला लावणारे इंद्रिय हे मेंदू नसून खिसा आहे “ आर्थिक स्थैर्याने हितसंबंध बदलत गेले. शिक्षकांचे वर्गच बदलून गेले. प्राथमिक शिक्षकांचे तरी पगार अजून तुलनेत कमी आहेत पण प्राध्यापकांच्या पगाराचे काय ? एका तालुक्याच्या किंवा त्यापेक्षा छोट्या गावात असलेल्या ठिकाणी लाखभर रुपयापेक्षा जास्त महिन्याला मिळणारी रक्कम तिथल्या माणसांपेक्षा तुम्हाला एकदम वेगळ्याच रस्त्यावर नेवून उभे करते. त्यातून व्यासंग वाढविण्यापेक्षा इस्टेट वाढविण्यावर भर दिला जातो. पाचव्या वेतन आयोगाचे वेळी कवि रामदास फुटाणे यांनी एक वेगळा मुद्दा मांडला होता. ते म्हणाले होते की ही वेतनवाढ घराघरात फुट पाडणार आहे. शेतकरी भाऊ आणि त्याचा नोकरदार भाऊ यांच्या उत्पन्नातील फरक जसा वाढत जाईल तसे दोघांचे जग वेगळे होऊन जाईल. हितसंबंध बदलतील आणि त्याचा परिणाम त्यांच्या नातेसंबंधावर होईल.आज ती भीती अगदी गावागावात आणि ग्रामीण भागातील घराघरात जाणवते आहे. या वर्गाचे समाजावरचे अवलंबित्व कमी झाल्यामुळे आत्ममग्नता वाढत गेली. बहुजन जातीतून जे शिक्षक झालेले होते त्यांनी त्यांच्या त्यांच्या जात समुहाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा होती. पण या नोकरदार असलेल्या वर्गाने स्वत:ला तोडून घेतले आणि शहरी जीवनाचे ते भाग झाले. पूर्वी गावाकडच्या भावाची मुले यांच्याकडे शिकायला असायची.पण ते चित्र आता अपवादाने दिसते आहे. त्या आर्थिक स्थिरतेतून मग गुंतवणूक सुरू झाली. वैचारिक चर्चांची जागा स्टाफरूममध्ये मग शेअर बाजाराच्या चर्चानी घेतली. असे काही बोलले की मग शिक्षकाने काय गरीब राहावे का ? असे विचारले जाते. पण प्रश्न गरीब राहण्याचा नाही तर या आर्थिक स्थिरतेने तो समाजाच्या गरीब वर्गापासून तुटला हे लक्षात आणून देणे हा आहे. त्यातून त्याचे वर्ग बदलले व तो आत्ममग्न होऊन समाजाचे नेतृत्व करण्याची अपेक्षा तो पूर्ण करीत नाही हे आहे.
या सर्व मुद्द्यावर प्रतिवाद असा केला जातो की शिक्षकाकडून तुम्ही आदर्शवादी अपेक्षा का करता ? तो ही याच समाजाचा भाग आहे. याच समाजात आज कोणताच समाजघटक नैतिकतेने वागत नसताना तुम्ही त्याच्याकडूनच का अपेक्षा करता ? त्याची जडण घडण शेवटी या समाजात असलेल्या आजच्या जीवनमूल्यांनीच झाली आहे ना ? हा युक्तिवाद बरोबर आहे. ज्या समाजात नीरव मोदी ,मल्ल्या लूट करून सुखाने जगत असताना राजकारणी व्यक्ति, ठेकेदार हे अप्रमाणिक मार्गाने कोट्यावधी रुपये कमावताना शिक्षकालाच उपदेश का करता ? असे विचारणे योग्यच आहे. पण प्रश्न वेगळा आहे.सगळा समाज जरी बिघडला तरी शिक्षकाला बिघडता येणार नाही कारण हा समाज सुधारायचे उत्तर आणि या गुंत्याची किल्ली हा शिक्षकच आहे. रात्रीच्या वेळी घाटातून गाडी चाललेली असते .सगळे प्रवासी झोपलेले असतात..अशावेळी ड्रायव्हर जर म्हणाला की सगळेच झोपलेत मग मी ही झोपलो तर काय हरकत आहे ? तर ती सर्वांचीच काळझोप ठरेल. ड्रायवर जागा आहे म्हणून तर सर्वजण झोपू शकले . तेव्हा समाज कितीही बिघडला तरी शिक्षकाला बिघडता येणार नाही. शिक्षक हा ते सारे दोष दूर करण्याची क्षमता असलेला नेता आहे.त्यामुळे शिक्षकाच्या अवमूल्यनची किंमत मोठी असते.शिक्षकावर टीका झाली की शिक्षक खूप दुखावतात.आमच्यावर इतकी टीका का होते ?असे ही विचारले जाते पण मी नेहमी म्हणतो जेव्हा जेव्हा शिक्षकावर समाज टीका करतो तेव्हा तेव्हा मला खूप आनंद होतो कारण याचा अर्थ समाजाने अजून शिक्षकवर्गाकडून आशा सोडलेली नाही.समाज राजकारणी काळाबाजारवाले यांच्यावर टीका करीत नाही कारण त्यांच्याकडून बदलण्याची आशाच सोडून दिली आहे पण शिक्षकाकडून समाजाच्या आशा अजून जिवंत आहेत हाच त्याचा अर्थ आहे..त्यामुळे शिक्षकावर जेव्हा समाजाची टीका थांबेल तो दिवस दुखा:चा असेल कारण समाजाने त्यांची आशाच सोडून दिलेली असेल.
तरीही या व्यवस्थेत काही शिक्षक अजूनही गुरुजी मनाचे आहेत त्यावर बोलले पाहिजे अन्यथा हेमूल्यमापन एकांगी होईल.महाराष्ट्रात फिरताना मला शिक्षकांचे ३ प्रकार दिसतात. राजकीय गैरफायदा,शिक्षक संघटनेचा लाभ घेणारा,अधिकाऱ्यांचा गैरफायदा घेणाराएक वर्ग आहे पण तो संख्येने खूप कमी आहे पण त्याचीच चर्चा जास्त होते. दुसरा गट सर्वात मोठा आहे तो जसे वळण द्याल तसा झुकणारा आहे.अर्थाततो काम करतोय पण त्यात प्रेरणा किंवा फार प्रतिभा समर्पण नाही पण तो लवचिक आहेआणि बदलू शकेल असा आहे. या वर्गाला दिशा देण्याची गरज आहे आणि तिसरा घटक हा २० ते २५ टक्के असलेला आहे.तो स्वयंप्रेरणेने काम करणारा आहे.या शिक्षकांना कोणी सूचना करण्याची गरज नाही ते आपाआपले काम करीत राहतात.त्यात प्रतिभा असते,समर्पण असते. असे खेड्यापाड्यात मी खूप शिक्षक पाहिले.
‘शिक्षक हा दरिद्रीच असला पाहिजे’ असा एक शोधनिबंध फारपूर्वी महाराष्ट्रात चर्चिला गेला होता. शिक्षक हा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसताना समाजाशी खूप जोडलेला होता आणि आता तो जसजसा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाला तसतसा तो समाजापासून तुटून गेला. एक जुने संस्थाचालक पूर्वी शिक्षण संघटनेचे नेते होते. त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांचे एक संस्थेतील शिक्षकांसमोर भाषण मी ऐकले. अतिशय व्यथित होऊन ते म्हणाले की संघटनेच्या माध्यमातून आम्ही शिक्षकांचे पगार वाढवा म्हणून संघर्ष केला, शिक्षकांचे पगार बँकेत करा म्हणून शिक्षकाला स्वयंपूर्ण पूर्ण केले पण तीच आज चूक झाली की काय ? असे आता मला वाटते आहे. मला त्यांचे शल्य समजू शकते. संघटनेच्या माध्यमातून शिक्षक नोकरीत स्थिर झाले पण त्या स्थिरतेने समाजाची शिक्षणाची आणि सर्वात जास्त शिक्षकाच्या स्वत:च्याच विकासाची खूप नुकसान केली. सुरक्षिततेने शिक्षक समूह हा अधिक स्थितीवादी झाला. अधिक व्यासंगहीन झाला आणि आर्थिक स्थैर्याने तर त्याची जगण्याची दिशाच बदलली.. शरद जोशी म्हणतात “ विचार करायला लावणारे इंद्रिय हे मेंदू नसून खिसा आहे “ आर्थिक स्थैर्याने हितसंबंध बदलत गेले. शिक्षकांचे वर्गच बदलून गेले. प्राथमिक शिक्षकांचे तरी पगार अजून तुलनेत कमी आहेत पण प्राध्यापकांच्या पगाराचे काय ? एका तालुक्याच्या किंवा त्यापेक्षा छोट्या गावात असलेल्या ठिकाणी लाखभर रुपयापेक्षा जास्त महिन्याला मिळणारी रक्कम तिथल्या माणसांपेक्षा तुम्हाला एकदम वेगळ्याच रस्त्यावर नेवून उभे करते. त्यातून व्यासंग वाढविण्यापेक्षा इस्टेट वाढविण्यावर भर दिला जातो. पाचव्या वेतन आयोगाचे वेळी कवि रामदास फुटाणे यांनी एक वेगळा मुद्दा मांडला होता. ते म्हणाले होते की ही वेतनवाढ घराघरात फुट पाडणार आहे. शेतकरी भाऊ आणि त्याचा नोकरदार भाऊ यांच्या उत्पन्नातील फरक जसा वाढत जाईल तसे दोघांचे जग वेगळे होऊन जाईल. हितसंबंध बदलतील आणि त्याचा परिणाम त्यांच्या नातेसंबंधावर होईल.आज ती भीती अगदी गावागावात आणि ग्रामीण भागातील घराघरात जाणवते आहे. या वर्गाचे समाजावरचे अवलंबित्व कमी झाल्यामुळे आत्ममग्नता वाढत गेली. बहुजन जातीतून जे शिक्षक झालेले होते त्यांनी त्यांच्या त्यांच्या जात समुहाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा होती. पण या नोकरदार असलेल्या वर्गाने स्वत:ला तोडून घेतले आणि शहरी जीवनाचे ते भाग झाले. पूर्वी गावाकडच्या भावाची मुले यांच्याकडे शिकायला असायची.पण ते चित्र आता अपवादाने दिसते आहे. त्या आर्थिक स्थिरतेतून मग गुंतवणूक सुरू झाली. वैचारिक चर्चांची जागा स्टाफरूममध्ये मग शेअर बाजाराच्या चर्चानी घेतली. असे काही बोलले की मग शिक्षकाने काय गरीब राहावे का ? असे विचारले जाते. पण प्रश्न गरीब राहण्याचा नाही तर या आर्थिक स्थिरतेने तो समाजाच्या गरीब वर्गापासून तुटला हे लक्षात आणून देणे हा आहे. त्यातून त्याचे वर्ग बदलले व तो आत्ममग्न होऊन समाजाचे नेतृत्व करण्याची अपेक्षा तो पूर्ण करीत नाही हे आहे.
या सर्व मुद्द्यावर प्रतिवाद असा केला जातो की शिक्षकाकडून तुम्ही आदर्शवादी अपेक्षा का करता ? तो ही याच समाजाचा भाग आहे. याच समाजात आज कोणताच समाजघटक नैतिकतेने वागत नसताना तुम्ही त्याच्याकडूनच का अपेक्षा करता ? त्याची जडण घडण शेवटी या समाजात असलेल्या आजच्या जीवनमूल्यांनीच झाली आहे ना ? हा युक्तिवाद बरोबर आहे. ज्या समाजात नीरव मोदी ,मल्ल्या लूट करून सुखाने जगत असताना राजकारणी व्यक्ति, ठेकेदार हे अप्रमाणिक मार्गाने कोट्यावधी रुपये कमावताना शिक्षकालाच उपदेश का करता ? असे विचारणे योग्यच आहे. पण प्रश्न वेगळा आहे.सगळा समाज जरी बिघडला तरी शिक्षकाला बिघडता येणार नाही कारण हा समाज सुधारायचे उत्तर आणि या गुंत्याची किल्ली हा शिक्षकच आहे. रात्रीच्या वेळी घाटातून गाडी चाललेली असते .सगळे प्रवासी झोपलेले असतात..अशावेळी ड्रायव्हर जर म्हणाला की सगळेच झोपलेत मग मी ही झोपलो तर काय हरकत आहे ? तर ती सर्वांचीच काळझोप ठरेल. ड्रायवर जागा आहे म्हणून तर सर्वजण झोपू शकले . तेव्हा समाज कितीही बिघडला तरी शिक्षकाला बिघडता येणार नाही. शिक्षक हा ते सारे दोष दूर करण्याची क्षमता असलेला नेता आहे.त्यामुळे शिक्षकाच्या अवमूल्यनची किंमत मोठी असते.शिक्षकावर टीका झाली की शिक्षक खूप दुखावतात.आमच्यावर इतकी टीका का होते ?असे ही विचारले जाते पण मी नेहमी म्हणतो जेव्हा जेव्हा शिक्षकावर समाज टीका करतो तेव्हा तेव्हा मला खूप आनंद होतो कारण याचा अर्थ समाजाने अजून शिक्षकवर्गाकडून आशा सोडलेली नाही.समाज राजकारणी काळाबाजारवाले यांच्यावर टीका करीत नाही कारण त्यांच्याकडून बदलण्याची आशाच सोडून दिली आहे पण शिक्षकाकडून समाजाच्या आशा अजून जिवंत आहेत हाच त्याचा अर्थ आहे..त्यामुळे शिक्षकावर जेव्हा समाजाची टीका थांबेल तो दिवस दुखा:चा असेल कारण समाजाने त्यांची आशाच सोडून दिलेली असेल.
तरीही या व्यवस्थेत काही शिक्षक अजूनही गुरुजी मनाचे आहेत त्यावर बोलले पाहिजे अन्यथा हेमूल्यमापन एकांगी होईल.महाराष्ट्रात फिरताना मला शिक्षकांचे ३ प्रकार दिसतात. राजकीय गैरफायदा,शिक्षक संघटनेचा लाभ घेणारा,अधिकाऱ्यांचा गैरफायदा घेणाराएक वर्ग आहे पण तो संख्येने खूप कमी आहे पण त्याचीच चर्चा जास्त होते. दुसरा गट सर्वात मोठा आहे तो जसे वळण द्याल तसा झुकणारा आहे.अर्थाततो काम करतोय पण त्यात प्रेरणा किंवा फार प्रतिभा समर्पण नाही पण तो लवचिक आहेआणि बदलू शकेल असा आहे. या वर्गाला दिशा देण्याची गरज आहे आणि तिसरा घटक हा २० ते २५ टक्के असलेला आहे.तो स्वयंप्रेरणेने काम करणारा आहे.या शिक्षकांना कोणी सूचना करण्याची गरज नाही ते आपाआपले काम करीत राहतात.त्यात प्रतिभा असते,समर्पण असते. असे खेड्यापाड्यात मी खूप शिक्षक पाहिले.
पहिलीचा मुलगा एक कोटीपर्यंत शब्द लिहिताना दिसला. ऑस्ट्रेलिया सारखा शब्द लिहिताना पाहिला. खूप शैक्षणिक साहित्य बनविलेले शिक्षक भेटले. तंत्रज्ञान आत्मसात करून जागतिक दर्जाचे अनेक शिक्षक आज महाराष्ट्रात आहेत. सामाजिक चळवळीत भाग घेणारे शिक्षक आहेत. महाराष्ट्रातील अनेक चांगले लेखक,कवी हे शिक्षक व प्राध्यापक आहेत.मी शोध याचा घेतो आहे की ही माणसे अशी वेगळी का असतील ? नेमकी कोणती गोष्ट यांना इतरांपेक्षा वेगळी बनवत असेल ? प्रतिकूल परिस्थिती यांना निराश करत नसेल का ? कशातून हे उमेद टिकवतात? हा मला प्रश्न पडला.अगदी छोट्या छोट्या प्रेरणेने माणसे काम करत राहतात. या गुरुजी संस्कृतीच्या शिक्षकांना वंदनच केले पाहिजे फक्त याचे सार्वत्रिकरण कसे करायचे हा खरा मुद्दा आहे.
शेवटचा मुद्दा जागतिकीकरणात गुरुजी निर्माण होतील की सगळीकडे सर--सर असतील ? याचे उत्तर जागतिकीकरण आज शिक्षकाची भूमिका मर्यादित करायला निघाले आहे. नव्हे शिक्षकाला रोबो हा पर्याय निर्माण करणार आहे. गुरुकुलातला पूर्णवेळ शिक्षक ते आजचा ऑनलाइन शिक्षक हा प्रवास जागतिकीकरण घडविणार आहे. शिक्षकाशिवायची शिक्षणपद्धती जिथे येऊ घातली आहे तिथे गुरुजी युग सोडाच पण सर तरी शिल्लक राहतील का ? हा मला प्रश्न पडतोय. संपादकाशिवाय जर पेपर निघू शकतो , अनिमेटेड फिल्म मध्ये नायकाशिवाय चित्रपट असू शकतो तर मग शिक्षकाशिवाय शाळा का चालू शकणार नाही ? असा इथून पुढचा युक्तिवाद असणार आहे. आणि खरे तर वेगाने आत्मकेंद्रित होत चाललेल्या आजच्या समाजाला प्रेम,माया,करुणा शिकवायला पुन्हा एकदा गुरुजीसंस्कृतीच आवश्यक असणार आहे. ही गुरुजी संस्कृतीच काय पण ऑनलाइन शिक्षक नव्हे तर instructor असलेल्या येणार्या काळात हा समाज कसा असेल याची कल्पनाच येत नाही पण जोपर्यंत आपण प्रेम आणि करुणा ही मूल्ये download करू शक्त नाही तोपर्यंत तीच मूल्ये शिक्षणातून संक्रमित करावी लागणार आहेत. त्यासाठी पुन्हा गुरुजी युगाचीच आस धरावी लागेल ..
हे सारे कसे करावे ? याचे उत्तर शोधायला पुन्हा एकदा साने गुरुजींकडे जावे लागेल असे वाटायला लागलं...ज्यांचे नंबर डॉक्टर इंजिनिअरिंग ला लागू शकले असते असे अनेकजण शिक्षक झालेत आणि अनेक नेट सेट सारखी अवघड परीक्षा पास झालेले प्राध्यापक झालेत पण त्यांच्यामुळे शिक्षणव्यवस्था बदलली नाही. ते समर्पित फारसे आढळेना त्यातून शिक्षक हा जितका स्वप्नाळू भाबडा आणि भावुकच तितका तो अधिक चांगला शिक्षक होण्याची शक्यता जास्त हे लक्षात येत गेले. इथे बुद्धिमत्तेइतकेच मुलांविषयी कणव वाटणे सर्वोच्च महत्वाचे आहे हे समजल्यावर साने गुरुजी हीच लस पुन्हा एकदा शिक्षक समुदायात द्यावी लागेल याची खात्री पटली.. तेव्हा अशा गुरुजी संस्कृती ज्यांच्या रक्तात आहे अशा शिक्षकांना शिक्षक समुदायला भेटविले पाहिजे. शिक्षक प्रशिक्षण हा शब्द आता किळसवाणा झाला आहे. त्यासाठी निसर्गरम्य ठिकाणी निवासी केंद्र उभारली पाहिजेत. शिक्षकांना तिथे निवासी काही दिवस राहण्याची सोय करावी व तिथे महात्मा फुले महात्मा गांधीपासून जे पी नाईक कृष्णमूर्ति साने गुरुजी ओशो या सर्वांच्या विचाराचा परिचय करून द्यावा. जगातील,भारतातील आणि महाराष्ट्रातील उत्कृष्ट शिक्षकांच्या मुलाखतीच्या फिल्म असाव्यात...जीवनशैली बदलण्यापासून विपश्यनेपर्यंत सगळे शिकवावे आणि त्यातून शिक्षक बदलण्याची सुरुवात होईल.
शेवटचा मुद्दा जागतिकीकरणात गुरुजी निर्माण होतील की सगळीकडे सर--सर असतील ? याचे उत्तर जागतिकीकरण आज शिक्षकाची भूमिका मर्यादित करायला निघाले आहे. नव्हे शिक्षकाला रोबो हा पर्याय निर्माण करणार आहे. गुरुकुलातला पूर्णवेळ शिक्षक ते आजचा ऑनलाइन शिक्षक हा प्रवास जागतिकीकरण घडविणार आहे. शिक्षकाशिवायची शिक्षणपद्धती जिथे येऊ घातली आहे तिथे गुरुजी युग सोडाच पण सर तरी शिल्लक राहतील का ? हा मला प्रश्न पडतोय. संपादकाशिवाय जर पेपर निघू शकतो , अनिमेटेड फिल्म मध्ये नायकाशिवाय चित्रपट असू शकतो तर मग शिक्षकाशिवाय शाळा का चालू शकणार नाही ? असा इथून पुढचा युक्तिवाद असणार आहे. आणि खरे तर वेगाने आत्मकेंद्रित होत चाललेल्या आजच्या समाजाला प्रेम,माया,करुणा शिकवायला पुन्हा एकदा गुरुजीसंस्कृतीच आवश्यक असणार आहे. ही गुरुजी संस्कृतीच काय पण ऑनलाइन शिक्षक नव्हे तर instructor असलेल्या येणार्या काळात हा समाज कसा असेल याची कल्पनाच येत नाही पण जोपर्यंत आपण प्रेम आणि करुणा ही मूल्ये download करू शक्त नाही तोपर्यंत तीच मूल्ये शिक्षणातून संक्रमित करावी लागणार आहेत. त्यासाठी पुन्हा गुरुजी युगाचीच आस धरावी लागेल ..
हे सारे कसे करावे ? याचे उत्तर शोधायला पुन्हा एकदा साने गुरुजींकडे जावे लागेल असे वाटायला लागलं...ज्यांचे नंबर डॉक्टर इंजिनिअरिंग ला लागू शकले असते असे अनेकजण शिक्षक झालेत आणि अनेक नेट सेट सारखी अवघड परीक्षा पास झालेले प्राध्यापक झालेत पण त्यांच्यामुळे शिक्षणव्यवस्था बदलली नाही. ते समर्पित फारसे आढळेना त्यातून शिक्षक हा जितका स्वप्नाळू भाबडा आणि भावुकच तितका तो अधिक चांगला शिक्षक होण्याची शक्यता जास्त हे लक्षात येत गेले. इथे बुद्धिमत्तेइतकेच मुलांविषयी कणव वाटणे सर्वोच्च महत्वाचे आहे हे समजल्यावर साने गुरुजी हीच लस पुन्हा एकदा शिक्षक समुदायात द्यावी लागेल याची खात्री पटली.. तेव्हा अशा गुरुजी संस्कृती ज्यांच्या रक्तात आहे अशा शिक्षकांना शिक्षक समुदायला भेटविले पाहिजे. शिक्षक प्रशिक्षण हा शब्द आता किळसवाणा झाला आहे. त्यासाठी निसर्गरम्य ठिकाणी निवासी केंद्र उभारली पाहिजेत. शिक्षकांना तिथे निवासी काही दिवस राहण्याची सोय करावी व तिथे महात्मा फुले महात्मा गांधीपासून जे पी नाईक कृष्णमूर्ति साने गुरुजी ओशो या सर्वांच्या विचाराचा परिचय करून द्यावा. जगातील,भारतातील आणि महाराष्ट्रातील उत्कृष्ट शिक्षकांच्या मुलाखतीच्या फिल्म असाव्यात...जीवनशैली बदलण्यापासून विपश्यनेपर्यंत सगळे शिकवावे आणि त्यातून शिक्षक बदलण्याची सुरुवात होईल.
शिक्षकांनी वाचन करावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावेत.
पण कधीकधी वाटते शिक्षक बदलत नाही याला कारण त्यांच्यावरील अधिकारी मुख्याध्यापक हे प्रेरणादायी नाहीत. तेव्हा ७ लाख शिक्षकांच्या मागे लागण्यापेक्षा ३५ शिक्षणाधिकारी ,३५४ गट शिक्षणाधीकारी ,४५०० केन्द्र्प्रमुख, १५०० विस्ताराधिकारी ,सर्व विद्यापीठ कुलगुरू आणि प्रत्येक महाविद्यालयाचे प्राचार्य हे बदलण्यावर भर दिला पाहिजे . हे बदलले की शिक्षक सहज बदलतील. एक शिक्षक मला तळतळून म्हणाला होता “ सर अहो आम्ही शिक्षक म्हणजे यंत्र आहोत तुम्ही कोंबडी मागा कोंबडी देतो. पैसे मागा पैसे देतो आणि काम मागा काम देतो “ तेव्हा खरी गुरुजी होण्याची संस्कृती वरुण खाली झिरपायला हवी.. अधिकारी मनाने गुरुजी होणे गरजेचे आहे त्यातून सरांचे गुरुजी वेगाने
पण कधीकधी वाटते शिक्षक बदलत नाही याला कारण त्यांच्यावरील अधिकारी मुख्याध्यापक हे प्रेरणादायी नाहीत. तेव्हा ७ लाख शिक्षकांच्या मागे लागण्यापेक्षा ३५ शिक्षणाधिकारी ,३५४ गट शिक्षणाधीकारी ,४५०० केन्द्र्प्रमुख, १५०० विस्ताराधिकारी ,सर्व विद्यापीठ कुलगुरू आणि प्रत्येक महाविद्यालयाचे प्राचार्य हे बदलण्यावर भर दिला पाहिजे . हे बदलले की शिक्षक सहज बदलतील. एक शिक्षक मला तळतळून म्हणाला होता “ सर अहो आम्ही शिक्षक म्हणजे यंत्र आहोत तुम्ही कोंबडी मागा कोंबडी देतो. पैसे मागा पैसे देतो आणि काम मागा काम देतो “ तेव्हा खरी गुरुजी होण्याची संस्कृती वरुण खाली झिरपायला हवी.. अधिकारी मनाने गुरुजी होणे गरजेचे आहे त्यातून सरांचे गुरुजी वेगाने
हेरंब कुलकर्णी
फोन८२०८५८९१९५
herambkulkarni1971@gmail.com
ताजा कलम – असे लेख लिहिल्यावर सगळेच असे आहेत का ? चांगले शिक्षक दिसत नाहीत का ? हे खूप ऐकावे लागते. अशा शिक्षकांवर लिहिलेच आहे .त्यांना वंदन कारण त्यांच्या प्रेरणेवरच सारी आशा जीवंत आहे पण रस्त्यात खड्डे पडल्यावर आपण खड्ड्यांचा फोटो छापतो तेव्हा चांगला रस्ता दिसत नाही का हे विचारण्यात अर्थ नसतो..प्रश्न व्यवस्था बदलण्याचा आहे त्यामुळे त्याची उत्तरे व्यक्तीगत आहेत पण त्यापेक्षा जास्त व्यवस्थात्मक आहेत.
फोन८२०८५८९१९५
herambkulkarni1971@gmail.com
ताजा कलम – असे लेख लिहिल्यावर सगळेच असे आहेत का ? चांगले शिक्षक दिसत नाहीत का ? हे खूप ऐकावे लागते. अशा शिक्षकांवर लिहिलेच आहे .त्यांना वंदन कारण त्यांच्या प्रेरणेवरच सारी आशा जीवंत आहे पण रस्त्यात खड्डे पडल्यावर आपण खड्ड्यांचा फोटो छापतो तेव्हा चांगला रस्ता दिसत नाही का हे विचारण्यात अर्थ नसतो..प्रश्न व्यवस्था बदलण्याचा आहे त्यामुळे त्याची उत्तरे व्यक्तीगत आहेत पण त्यापेक्षा जास्त व्यवस्थात्मक आहेत.
Social Plugin