सरकारी यंत्रणा जलयुक्त शिवार अभियानात
राबत नसल्याचे चिञ
मुंबई : जलयुक्त शिवार अभियान ढेपाळलेले असताना आमिर खानच्या वॉटर कपला मात्र जोरात प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, वॉटर कप स्पर्धेसाठी सरकारी यंत्रणेने सहकार्य करावे अशा खुद्द मुख्यमंत्र्यांच्याच सुचना आहेत. त्यामुळे तलाठी, ग्रामसेवक, तहसिलदार, प्रांत, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा परिषदांचे सीईओ, जिल्हाधिकारी असे सगळे महत्वाचे अधिकारी वॉटर कप स्पर्धेअंतर्गत गावागावांत जलसंधारणाची कामे राबविण्यासाठी कष्ट घेत आहेत. पण हेच अधिकारी जलयुक्त शिवार अभियानासाठी राबत नसल्याचे दिसत आहे राज्य सरकारचा `फ्लॅग शिप` कार्यक्रम म्हणून गेल्या तीन वर्षात गाजावाजा झालेले `जलयुक्त शिवार अभियान` सध्या ढेपाळलेल्या स्थितीत आहे. लाल फितीच्या कारभारामुळे जलयुक्त शिवारचा झंझावात कमी झाल्याचे दिसत आहे. दुस-या बाजूला सरकारी यंत्रणेचाच वापर करून आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेली वॉटर कप स्पर्धा मात्र गावागावांमध्ये लोकप्रिय होत चालली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच वर्षी जलयुक्त शिवार अभियान धडाक्यात सुरू करण्यात आले होते. दरवर्षी साधारण पाच हजार गावे निवडली जातात. पहिल्या वर्षांत या योजनेला लोकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. गावांतील जनता, सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपन्या अशा सगळ्या घटकांचा जलयुक्तमध्ये सहभाग होता. दुस-या वर्षीही ही योजना उत्मम प्रकारे चालली. पण त्यानंतर मात्र जलयुक्तचा झंझावात मावळल्याचे दिसत आहे.
जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग अनुत्साही असल्याचे चित्र आहे. जलयुक्त शिवार अभियान पहिल्याच वर्षी सुरू झाले तेव्हाचे जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख हे राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांच्या व्हीडीओ कॉन्फरन्स घ्यायचे. सतत अहवाल मागवायचे. प्रत्येक जिल्ह्यांतील कामाचा आढावा घ्यायचे. अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सुचवायचे. तळागाळात जाऊन कामे पाहायचे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील सरकारी यंत्रणा जोरदारपणे काम करायची. आता तेवढ्या ताकदीने मंत्रालयातून कामांचा आढावा घेतला जात नाही. या उलट जलसंधारणांच्या कामासाठी बनविलेले नियम अत्यंत किचकट आहेत. कामे तातडीने मंजूर होत नाहीत. त्यामुळे जिल्हा व तालुका पातळीवरील अधिका-यांमध्येही या योजनेविषयी उत्साह राहिला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
राबत नसल्याचे चिञ
मुंबई : जलयुक्त शिवार अभियान ढेपाळलेले असताना आमिर खानच्या वॉटर कपला मात्र जोरात प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, वॉटर कप स्पर्धेसाठी सरकारी यंत्रणेने सहकार्य करावे अशा खुद्द मुख्यमंत्र्यांच्याच सुचना आहेत. त्यामुळे तलाठी, ग्रामसेवक, तहसिलदार, प्रांत, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा परिषदांचे सीईओ, जिल्हाधिकारी असे सगळे महत्वाचे अधिकारी वॉटर कप स्पर्धेअंतर्गत गावागावांत जलसंधारणाची कामे राबविण्यासाठी कष्ट घेत आहेत. पण हेच अधिकारी जलयुक्त शिवार अभियानासाठी राबत नसल्याचे दिसत आहे राज्य सरकारचा `फ्लॅग शिप` कार्यक्रम म्हणून गेल्या तीन वर्षात गाजावाजा झालेले `जलयुक्त शिवार अभियान` सध्या ढेपाळलेल्या स्थितीत आहे. लाल फितीच्या कारभारामुळे जलयुक्त शिवारचा झंझावात कमी झाल्याचे दिसत आहे. दुस-या बाजूला सरकारी यंत्रणेचाच वापर करून आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेली वॉटर कप स्पर्धा मात्र गावागावांमध्ये लोकप्रिय होत चालली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच वर्षी जलयुक्त शिवार अभियान धडाक्यात सुरू करण्यात आले होते. दरवर्षी साधारण पाच हजार गावे निवडली जातात. पहिल्या वर्षांत या योजनेला लोकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. गावांतील जनता, सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपन्या अशा सगळ्या घटकांचा जलयुक्तमध्ये सहभाग होता. दुस-या वर्षीही ही योजना उत्मम प्रकारे चालली. पण त्यानंतर मात्र जलयुक्तचा झंझावात मावळल्याचे दिसत आहे.
जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग अनुत्साही असल्याचे चित्र आहे. जलयुक्त शिवार अभियान पहिल्याच वर्षी सुरू झाले तेव्हाचे जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख हे राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांच्या व्हीडीओ कॉन्फरन्स घ्यायचे. सतत अहवाल मागवायचे. प्रत्येक जिल्ह्यांतील कामाचा आढावा घ्यायचे. अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सुचवायचे. तळागाळात जाऊन कामे पाहायचे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील सरकारी यंत्रणा जोरदारपणे काम करायची. आता तेवढ्या ताकदीने मंत्रालयातून कामांचा आढावा घेतला जात नाही. या उलट जलसंधारणांच्या कामासाठी बनविलेले नियम अत्यंत किचकट आहेत. कामे तातडीने मंजूर होत नाहीत. त्यामुळे जिल्हा व तालुका पातळीवरील अधिका-यांमध्येही या योजनेविषयी उत्साह राहिला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
Social Plugin